Monday, November 25, 2019

अजित पवार यांचा व्हिप अंतिम

राष्ट्रवादी आणि भाजप याचे सरकार स्थापन झालेले आहे. अजित पवार हे अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच आमदारांना मतदान करावे लागेल', असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
ज्या कपिल सिब्बल यांनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचे मंदिर बांधू नये, असे म्हटले होते. त्यांच्यावर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. शेतकरी अडचणीत असताना भाजप आमदार शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा मारत आहेत, असेही दानवे म्हणाले.

No comments:

Post a Comment